जनसामान्यांच्या शब्दाला आधार देणारा नेता - संदिपशेठ मुंढे 
जनसामान्यांच्या शब्दाला आधार देणारा नेता - संदिपशेठ मुंढे

 


 

जनसामान्यांच्या शब्दाला आधार देऊन त्यांच्या समस्येचे सहजतेने समाधान करून  प्रेम देणारा नेता म्हणजेच संदिप मुंढे यांच्या सहवासातून सामान्य जनतेला जिवन जगायला सोप होत आहे. सामान्य जनता आपल्या समस्या संदिप मुढे यांच्या कडे घेऊन येत असतात व व्यक्त करत असतात.जनमानसाशी संवाद साधताना शब्द बोलताना  शब्दाला धार नको तर आधार असला पाहिजे कारण धार असलेले शब्द मन कापतात आणी आधार देणारे शब्द मन जिंकतात.आणी सामान्याच्या शब्दाला आधार देणारा नेता म्हणजेच  संदिपशेठ मुंढे त्यांच्या शब्दा मध्ये सामान्य जनतेला आधार मिळत असल्यामुळे सामान्य जनता त्यांच्या कडे  समस्या घेऊन येत असतात. संदिप मुंढे यांनी जनतेच्या  समस्या सोडवून असंख्य मित्र बनवले आहेत  ते मित्र संदिप मुंढे यांची ते कधीही साथ सोडणार नाहीत.संदिप मुंढे कार्यकत्यावर निस्वार्थ प्रेम करतात.संदिप मुंढे यांनी कार्यकर्ते यांच्या रुद्ययात प्रेम वात्सल्याचे स्थान निर्माण केले असून त्याला ते कधीही तडा जाणार नाही असे स्थान निर्माण केले आहे. 

संदिप मुंढे यांनी आपल्या प्रेमल स्वभावाने असे मित्र बनविलेत की ते सावळी प्रमाणे सोबत असतात व आरश्या प्रमाणे सत्य माहिती देत असतात कारण आरसा कधी खोट बोलत नाही आणी सावळी कधी साथ सोडत नाही.......

दिन दुबल्यांची गरजू व्यक्तींसाठी सातत्याने झुकणारे जनसामान्यांच्या हाकेला धावणारा अशी प्रतिमा असलेला नेता संदिपशेठ मुंढे समाजात त्यांचे नाव आदराने घेतले जाते...असे म्हणतात कि कर्तृत्व निर्माण  करण्यासाठी राजकीय बलाढ्य हस्तीचे वरद हस्त असावेच लागते. खर्‍या अर्थाने संदिप मुंढे यांना आमदार सुरेशभाऊ लाड आणि सुनिलजी तटकरे साहेबांचे पाठबळ असल्यामुळे वासांबे विभागात संदीप मुढे यांनी गरुड भरारी घेतली आणि राष्ट्रवादी पार्ट्रीच्या माध्यमातून उमा मुंढे यांना दोनवेळा जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत निवडून आणल्या. आज त्यांच्याकडे रा.जि.प.चे महिला व बाळ कल्याण सभापती असे महत्त्वाच्या  खात्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. खर्‍या अर्थाने सुरेशभाऊ लाड साहेब आणि सुनिलजी तटकरे साहेबांच्या आशीर्वादाने सर्व घडले त्याचबरोबर मतदार राज्याच्या प्रेमामुळे आज जिल्ह्यांची जबाबदारी यशस्वीपणे उमाताई मुंढे सांभालळीआहे.

नेता हा सहज होत नसतो त्यासाठी शरीराची ढाल करावी लागते.जनसामान्यांचे प्रश्‍न मार्गी लावावे लागतात. तेव्हा कुठे त्यास नेता म्हटले जाते. गेल्या वीस वर्षात राजकारणात असताना कधीही पराजित न झालेले संदिप मुंढे, राजकारण, समाजकारण कसे करावे हे त्यांच्याकडून शिकावे, संदिप मुंढे यांनी राजकारणाचे धडे लहानपणापासून गिरवित असताना, आपण ही ह्या समाज्यासाठी काहीतरी करावे हे विचार सातत्याने त्यांना स्वस्त बसू देत नव्हते आणि त्यावेळी होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत उमेदवार म्हणून उभे राहिले. जनसामान्यांच्या प्रेमामुळे ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये निवडून येऊन सरपंच पदावर विराजमान झाले आणि विभागातील विविध विकासकामे  केली. आजही ते सदस्य म्हणून काम करीत आहेत.

एखादी व्यक्ती संदिप मुंढे कडे आली आणि ती व्यक्ती रिकाम्या हातानी गेली असे आजतागत घडले नाही. त्या व्यक्तीचे प्रश्‍न मार्गी लावल्याशिवाय संदिप मुंढे स्वस्त बसत नाहीत. याच उल्लेखनीय स्वभावाने संदिप मुंढेची हाक आणि जनतेची साथ मिळाल्याने राजकीय प्रतिस्पर्धीचा संदिप मुंढे यांच्यासमोर टीकाव लागत नाही. नेते अनेक निर्माण होतात, मात्र जनसामान्यांच्या मनामध्ये आपुलकीचे घर निर्माण करणारे आणि जनसामान्यांना प्रेम देणारे नेते खूपच कमी असतात. जी व्यक्ती दुसर्‍याचे दु:ख समजते आणि त्यांच्यावर प्रसंग निर्माण झाल्यास ती पुढे सरसाऊन त्याच्या समस्यांचा निपटारा करते अशी अगळीवेगळी छाप जनमानसात उमटवणारी व्यक्ती म्हणजेच आज संदिपशेठ मुंढे.

राजकारण काही लोक येतात ती स्वःताची तुंबडी भरण्यासाठी, मात्र संदिप मुंढे सारखी व्यक्ती या परिसरात लाभली आणि येथील राजकारणाची दिशाच बदलली. कारण त्यांच्याजवळ गेलेली व्यक्ती जाताना समस्या घेऊन जात असते व येताना मात्र चेहर्‍यावरती हास्य घेवून बाहेर पडते. मग ते काम कोणतेही असो. संदिप मुंढे हे समस्येचे निपटारा करताना एक पाऊल पुढेच...मग तो कामगार क्षेत्र असो अथवा शेतकरी वर्ग. सर्वांच्या वरती मायेची सावली निर्माण करायची आणि प्रत्येकाला न्याय मिळवून द्यायचा. ऐंशी टक्के समाजकारण आणी वीस टक्के राजकारण याच विचारांतून त्यांनी माणसे जोडण्याचा सपाटा निर्माण केला. कारण जी माणसे जोडली गेली ती पक्षाशी एकनिष्ठ राहिली. सांगायचे एकच की ज्यांना आधार दिला त्यांचे विचारांतून संदिप मुंढे यांनी एक क्रांतीच निर्माण केली. यामुळे पक्ष वाढण्यास मदत झाली. आमदार सुरेशभाऊ लाड यांचे मार्गदर्शन आणि सुनिलजी तटकरे साहेबांचा खंबीर आधार आणि जनतेचे प्रेमामुळे त्यांनी सरपंच पदावर असताना विविध विकासकामे समाजउपयोगी कार्यक्रम राबवून त्यांनी या परिसरात एक मिशाल निर्माण केली. आज त्यांच्या पत्नी दोन वेळा जिल्हा परिषद निवडून येत आहे. यावर्षी ही जनतेनी पुन्हा एकदा काम करण्याची त्यांना संधी दिली म्हणून त्या जिल्हा परिषदेवर निवडून आल्या. आज त्यांच्याकडे रा.जि.प.चे महिला व बाळ कल्याण सभापती हे खाते ते उत्तमरित्या सांभाळल आहे. मात्र हे सर्व करीत असताना, आपल्या विभागाकडे सातत्याने लक्ष आहे. आपल्या परिसरातील एखादी व्यक्ती पुढे जावी आणि त्यांनी गगनभरी झेप घ्यावी या विचारांतून आजही त्याच्यामध्ये कामाचा उत्साह आहे. प्रत्येकांच्या हाकेला धावणारा मुंढे म्हणून या पंचक्रोशीत तसेच तालुक्यात त्यांच्या नावाचा हातखंडा आहे.

या परिसरात अथवा तालुका, जिल्हा  ठिकाणी कार्यक्रम असले की मुंढे हजर यामुळे त्यांच्या कामाच्या विषयी आजही बोल बाळा ऐकण्यास मिळत आहे. आजही प्रत्येक व्यक्ती संदिप मुंढेवर प्रेम करीत आहे, मात्र नुसते बोल नाहीतर प्रत्यक्ष कामी कृती ते स्विकारत आहेत. 

वाढदिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करत असतात.या पुर्वी त्यांनी  विधवा महिलांसाठी विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहचविणे त्याचबरोबर मुलांना शुषीवृत्ती, प्रत्येकांनी वाचन केले पहिजे पुस्तक वाचल्याने मस्तक सुधारते.एकदा मस्तक सुधारले की ते कुणापुढे नतमस्तक होत नाही यांच विचारांतून त्यांनी गणेशनगर येथे वाचनालय सुरु केले, आज जवळ-जवळ एक लाख पुस्तके आहेत आणि त्याचा उपयोग आजच्या तरुण पिढीला होत आहे. आज दिवसेंदिवस वाढत जाणारी महाघाई वाढत असताना मुलांचे शिक्षण कसे करावे, त्याचबरोबर लग्न कसे होईल यांच विचारांतून मुलांचे पालक चिंताग्रस्त असतात, मात्र आपण यावरती उपाययोजना निर्माण करुन सामुदायिक लग्न सोहळा लावून देण्याची संकल्पना त्यांनी विचारांत आणली. वाढत्या महागाईने सर्वसामान्य नागरिक हतबळ झाले आहेत. त्यांना धीर द्यावा या उद्देशाने सामूहिक विवाह सोहळ्यांचे नियोजन आखले जात असते.

यामुळे आनाठाई खर्चाला लगाम लागला जाईल हेच उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून त्यांची संकल्पना सत्यात उतरत आहे. त्याचबरोबर रक्तदान हे सर्व श्रेष्ठदान म्हटले गेले आहे. यामुळे माणसाला जीवनदान मिळू शकते. यासाठी त्यांनी अनेकवेळा ब्लड डोनेट कॅम्प आपल्या परिसरात राबवले. परर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शंभर वृक्ष लागवड न करता आले तरी चालेल किमान एक वृक्ष लागवड करू त्यांचे संवर्धन करता आले पाहिजे. आज अनियमित पडणारा पाऊस यामुळे अगामी काळातील धोके ओळखून सर्वांनी किमान एक वृक्ष लागवड करा.

शिवाय सध्या अनेक ठिकाणी घरघुती कचरा डोकेवर काढत आहे, मात्र याच्यावरती 70 ते 80 लाखांची उपकरणाचे नियोजन सुरु आहे. यामुळे घण कचर्‍यांचा प्रश्‍न मार्गी लागणार आहे. आज जिकडे-तिकडे कचरा पहावयास मिळत आहे.पावसाळ्यात तर हा कचरा कुजून दुर्गंधी येत असते, मात्र नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत एक पाऊल पुढे टाकत चांगली भूमिका, चांगली ध्येय आणि चांगले विचार असणारा नेता म्हणजे संदिपशेठ मुंढे आणि असाच नेता नेहमी जनतेच्या आठवणीत राहतात ते म्हणजेच संदिप मुंढे....अशा या नेतृत्वास  वाढदिवसानिमित्त कुलाबा प्रभात परिवाराकडून लाख लाख शुभेच्छा !


=======================


कुलाबा प्रभात नवलेखा पेज वाचकांसाठी खास माहिती ,या माहिती नुसार नियमित वाचा कुलाबा प्रभात नवलेखा पेज.


जिल्ह्यासह रसायनी पाताळगंगा परीसरातील सुपरफास्ट ब्रेकिंग न्युज तसेच कुलाबा प्रभात नवलेखा पेजच्या इतर न्युज वाचण्यासाठी, आपल्या मोबाईल मध्ये कुलाबा प्रभात नवलेखाची असलेली कोणतीही  न्युज लिंक ओपण केल्यानंतर All, ब्रेकिंग,राजकीय  च्या वरती दिसत असलेल्या कुलाबा प्रभातरव टच केल्यावर जिल्ह्यासह रसायनी पाताळगंगा परीसरातील सुपरफास्ट ब्रेकिंग न्युज तसेच कुलाबा प्रभातच्या इतर न्युज आपण वाचू शकता.

 

वाचकांसाठी ही खास सुविधा फक्त आणी फक्त कुलाबा प्रभात नवलेखा पेज वरच.

 

========================

 

कुलाबा प्रभात मार्गदर्शक - राकेश खराडे

कुलाबा प्रभात  संपादक - अमोल सांगळे

कुलाबा प्रभात उपसंपादक - वैभव पाटील

 

=========================