समर्पणातून समाधान शोधणारा माणूस -: राकेश खराडे
कळी युगात समाजाला गरज : तज्ञांचे मत.
कुलाबा प्रभात वृत्तसेवा
समाजातील घडामोडींकडे राकेश खराडे यांनी नेहमीच निःपक्षपाती नजरेने पाहिले.पत्रकारितेच्या माध्यमातून सत्य परिस्थिती जनतेपर्यंत पोहोचवताना,त्यांनी कधीच गाजावाजाचा मार्ग अवलंबला नाही तर संयमित आणि तटस्थ भूमिकेतून समाजमन जागृत ठेवण्याचं कार्य केलं.
राजकारणाच्या क्षेत्रात प्रवेश करतानाही राकेश दादा खराडे यांनी पक्षहितापेक्षा जनहिताचा मंत्र जपला. त्यांच्या निर्णयांमध्ये स्वार्थापेक्षा समाजाचा हितकारक विचार नेहमी अग्रस्थानी राहिला. राजकारण म्हणजे सत्तेचा खेळ नव्हे, तर लोकसेवेचं माध्यम असावं याच तत्त्वाचा ते आदर्श ठेवतात.आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे राकेश खराडे यांचे सामाजिक योगदान,अडचणीत सापडलेल्या व्यक्तींना त्वरित मदत मिळावी,हा त्यांचा सततचा प्रयत्न असतो. सेवेचा हा भाव,निस्वार्थतेची ही वृत्ती आणि प्रत्येक कृतीतून उमटणारा मानवी स्पर्श हेच त्यांचे खरे यश आहे.राकेश खराडे यांच्या जीवनातील प्रत्येक क्षणात नवीन प्रेरणा, नवी उर्जा आणि समाजासाठी नवे संकल्प फुलत राहोत, हीच मनःपूर्वक शुभेच्छा !


